Magel Tyala Shettale Yojana – आपल्याला माहीतच आहे, हवामानात बदल झाल्यामुळे पावसाळ्यात सुद्धा शेतकऱ्याला पाण्याची कमतरता भासत आहे. त्या मुळे भारत सरकारने शेतकऱ्यासाठी एक नवीन योजना तयार केली आहे ती म्हणजे मागेल त्याला शेततळे ह्या योजनेमुळे शेतकऱ्याला बराचसा फायदा होणार आहे . या योजनेतून शेतकऱ्याला पिकांसाठी, आणि शेतीतील. अनेक कामांसाठी फायदा होणार आहे. म्हणजे शेतीतील पिकांना आगदी वर्षभर पाण्याची काहीही अडचण नाही.

मागेल त्याला शेततळे या योजनेतून सर्व शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून आर्थिक अनुदान मिळत आहे . महाराष्ट्रातील किती तरी लोक ही शेती करूनच आपल पोट भरतात. आणि किती तरी भागातील शेती ही पूर्ण पने पावसावर निर्धारित आहे. आणि पाऊस ही वेळेवर नाही पडत त्या मुळे किती तरी लोकांच्या शेतीलील पिके पाणी नसल्या मुळे जळून जातात.
त्यामुळेच तर आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून मागेल त्याला शेततळे ही योजना तयार केली आहे आणि शेतकऱ्याला पाण्याच्या त्रास पासून करण्याचे ठरवले आहे . या योजनेतून शेतकऱ्याला शेती मधून जास्तीत जास्त उत्पादन मिळणार आहे व त्या पासून शेतकऱ्याचा फायदा होणार आहे .
अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा
ज्या शेतकऱ्या कडे शेती कमी किंवा शेतीचा आकार कमी प्रमाणात आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याला हवे आहे तेवढ्याच आकाराचे शेततळे शेतकऱ्याला बांधून मिळणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आणुदान मिळणार आहे ती रक्कम डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे .
या योजनेत दारिद्र्य रेषेखाली, व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि त्या नंतर जांनी जोजनेच अर्ज आगोदर भरलेला असेल त्यांना त्याच शेतकऱ्यांना या Magel Tyala Shettale योजनेसाठी निवडले जाईल.
शेततळ्याचे प्रकार
1) पाऊसाचे पाणी आडवून शेततळे.
2) आपल्या सपाट जागेवर शेततळे.
जागेची निवड
1) ज्या जागेवरून पाणी ज्यास्त प्रमाणात पाजरत नाही त्या ठिकाणी शेततळे बांधावे.
2) ज्या जागेवर मुरूम, व कमजोर खडक आसेल त्या ठिकाणी शेततळे बांधू नये.
3) शेत तळ्याला लागणारी जागा ही शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची आसावी.
अधिक वाचा : SBI च्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवा फक्त 444 दिवस पैसे अन् मिळवा आकर्षक व्याज, जाणून घ्या सविस्तर
मागेल त्याला शेततळे नियम व अटी | Magel Tyala Shettale Yojana Rules
ज्या शेतकऱ्याला शेततळे बांधायचे आहे तो शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी आसला पाहिजे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या जागेवर व त्याच मापाचे शेततळे शेतकऱ्याने बांधावे. शेततळे बांधण्याचे काम हे तीन महिन्याच्या आत पूर्ण झाले पाहिजे.
शेततळे बांधल्या नंतर शेतकऱ्याने आपल्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करून घ्यायची आहे.
आणि शेततळ्यातील पाण्याचा वापर करण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या खर्चातून मोटार, इंजिन बसवणे बंधन कारक आहे.
या योजने मुळे शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे व शेतीतून उत्पादन ही जास्त प्रमाणात मिळणार आहे.