शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रचंड पैसा उपलब्ध करावा लागतो. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना शेतीतील त्या पिकातून नफा मिळतो. पण अनेकदा शेतीतील ते पिक चांगले येत नाही, तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. आता शेतीमध्ये पैसा घालवायचा म्हटलं की, शेतकऱ्यांना त्या पिकासाठी पिक कर्ज काढावे लागते. आता याच पीक कर्जाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

पीक कर्ज योजना
शेतकऱ्यांना पिक लागवडीसाठी सरकारकडून पिकावर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चासाठी सावकाराकडे हात पसरावे लागत नाही. त्याचबरोबर सरकारने पीक कर्ज देण्यासाठी वेगवेगळ्या योजना देखील राबवते. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक व्याज सवलत योजना देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याज भरावे लागणार आहे.
पीक कर्ज नूतनीकरण योजना
तर शेतकरी मित्रांनो सरकारने पीक कर्ज नूतनीकरण योजना लागू केली आहे. या अंतर्गत जर शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाचे नूतनीकरण केले तर त्यांना सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच त्यांना चालू हंगामासाठी नव्याने पिक कर्ज तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या या पीक कर्ज सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण ही 30 जूनपर्यंत करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घ्यावे
जर शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत पीक कर्जाचे नूतनीकरण केले तर शेतकऱ्यांना 10 टक्के वाढीव कर्ज बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी पंतप्रधान अपघात विमा योजना सुरक्षा योजनेचा अवघे 20 रुपये भरून लाभ घ्यावा. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत 436 रुपये भरून दोन्ही योजनांसाठी प्रत्येक 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण घ्यावे, असेही आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.